पोटाचे पचनाचे आजार व उपचार
आजच्या धावपळीच्या, इंस्टट, बैठ्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक वरदान-शापाच्या यादीत सध्या सगळ्यांना सतावणाऱ्या आजारांमध्ये पोटाचे आजार अग्रणी आहे.
पोटाचे पचनाचे आजार व उपचार आहारशैलीत झालेला बदल, व्यायामाचा अभाव, शारीरिक मेहनती ऐवजी यंत्रांचा वाढता वापर, वाहनाचा अतिरेक, वाढलेले वजन, बैठी जीवनशैली ही कारणे दिसतात. रूग्ण दवाखान्यात येतो, सोबत रिपोर्टची थप्पी असणारी फाईल असते, सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात, पण तरीही रूग्णाची तक्रार असते की, डॉक्टर फ्रेश वाटत नाही, झोपावेसे वाटते, कितीही झोपले तरी झोप पूर्ण होत नाही आणि विशेष म्हणजे हा जडपणा कोणत्याही टेस्टमध्ये येत नाही.
चुकीचे खाणे, जेव्हा खायचे तेव्हा न खाता चुकीच्या वेळी खाणे रात्रीचे जागरण करणे, कँटीनचे जेवण, हॉटेलींग, रात्रीचे जागरण, फ्रोझन फुड्स, इन्स्टन्ट रेडी टू ईट, जंक फूड, पिझ्झा, बर्गर,तळलेले/आंबवलेले पदार्थ, गिरणीवर दळलेली कोंडा काढून टाकून खाण्यात येणारी पिठे
मैद्याचे पदार्थ अधिक प्रमाण खाणे, पॅकेज ज्यूस, हॉटेलमधील रसायनमिश्रित पदार्थ, चायनीज/ इटालिअन सॉस, ताज्या पदार्थांचा आहारातील अभाव, शीतपेयांचे / सोडा असलेली पेये यांचे प्रमाण आहारात वाढणे, ताज्या फळांचा आहारातील अभाव, पचायला जड अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश, चहाकॉफीचा अतिरेक, मद्य धूम्रपानादि व्यसने वाढणे.
आहारात नियमितपण नसणे, तासन्तास कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टि.व्ही. समोर बसणे, सतत खात रहाणे, अनेक दिवस शौचाला न जाणे. डोक्यावरील ताण, सतत विचार यामुळे मनापासून न जेवणे, अवेळी खाणे, जरूरीच्या मानाने कमी-अधिक खाणे, एखाद्या ठराविक देशात, काळी, निःसत्व खाणेपिणे यामुळे समाजात आरोग्याचा ऱ्हास होतोय.
बुध्दिजीवी, पांढरपेशी व्यक्ती व श्रमजीवी सर्वच वर्गात ही परिस्थिती आढळते. आपल्या प्रकृतीला, शरीरश्रमांना देशपरिस्थिती काल स्वरूपाला अनुरूप आहार न घेतल्याने पोटाचे विकार उत्पन्न होतात.
या सगळ्यांचा दुष्परिणाम शारीर अग्निवर होतो. ज्याचा अग्नि दीप्त किंवा चांगला आहे तो अनेक वर्षे निरोगी जीवन जगतो. अन्नपचनाला मुख्यतः अग्नि म्हणजेच शरीरातील पित्त हे कारण आहे. अग्नि शरीरात पित्ताच्या आश्रयाने रहातो. रसापासून रक्त बनणे हे धातूंचे पचनही धात्वग्निवरच अवलंबून असते.
आपण जो आहार घेतो, त्या आहाराचे पचन होऊन आपले दोष, धातु, मल हे पोसले जाणे हे खरे अग्निचे काम आहे. अग्निमांद्य होऊन त्यातून अजीर्ण, मलावष्टंभ, जडपणा, आळस याला सुरूवात होते. आमविष (न पचलेले विषारी अन्न) तयार होऊन शरीरात आजारसदृश्य स्थिती निर्माण होते व कोणत्याही क्षणी शरीर व्याधींचा बळी ठरू शकते.
भूक न लागणे, पोट साफ न होणे, गॅसेस, छातीत जळजळ, करपट ढेकर, घशात आंबट पाणी येणे, कामात उत्साह नसणे, शौचास वारंवार चिकट होणे, पोट दुखणे, कमी खाऊनही वजन वाढणे, चेहरा निस्तेज होणे, खुप तहान लागणे, बद्धकोष्ठता, मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन म्हणजेच रोजच्या भाषेत – पोट साफ न होणे.
मळभाग नीट तयार न होणे, तुकडे-तुकडे, पाणी अशी स्फुटीत मलप्रवृत्ती, शौचाला चिकट, फेसकट मलप्रवृत्ती, आव पडणे, पोट साफ झाल्यावर समाधान न होणे, जीभेला पांढरट थर रहातो, आणि पोट साफ झाल्याचे समाधानही होत नाही, इत्यादी प्रत्येक लक्षण तुमचे पोट बिघडल्याचे सुचित करते.
बदललेल्या जीवनपद्धतीमुळे पोटाचे आजार हि केवळ एवढीच व्याप्ती नसून याचा परिणाम म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीची कार्यक्षमता, तत्परता, एकाग्रता अनेक पटीने कमी झाली आहे. अनेक रुग्ण अभ्यासात लक्ष न लागणे, बुद्धि, स्मृति, एकाग्रता वाढविणे, वाचलेले लक्षात न राहणे, परीक्षेला किंवा इंटरव्हूला बसल्यावर छातीती धडधड होणे इत्यादी समस्या घेऊन येतात.

Pingback: बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज - www.harshalnemade.com
Pingback: केस वाढीसाठी उपाय - www.harshalnemade.com
Pingback: पंचकर्म फायदे - www.harshalnemade.com
Pingback: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली - आयुर्वेद - www.harshalnemade.com
Pingback: पुटपाक - www.harshalnemade.com
Pingback: Shirodhara-for peace शिरोधारा www.harshalnemade.com
मला मागील 10 वर्षापासून अपचनाचा त्रास आहे
औषधे हवी आहेत ती कशी मिळवायची
संपर्क करा:- 9175069155