वसंत ऋतुचर्या – आयुर्वेदानुसार ऋतूनुसार आरोग्य सांभाळण्याचे मार्ग

वसंत ऋतुचर्या – आयुर्वेदातील बसंत ऋतूसाठी आरोग्यदायी जीवनशैली व आहार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurveda, औंध पुणे

वसंत ऋतुचर्या – वसंत ऋतू उत्तरायणात दुसरा ऋतु, ह्या ऋतूत थंडी ओसरून हळू हळू सूर्याची किरणे तीव्र होऊ लागतात आणि वातावरणात गरमीची चाहूल लागते. 

वसंत ऋतु हा शीत व ग्रीष्म ऋतुचा संधिकाळ आहे. यावेळ अधिक थंडीही नसते व अधिक उकाडाही नसतो. या आंब्याच्या मोहराच्या मनमोहक सुवासाने युक्‍त वारे सर्वत्र असतात. वसंत ऋतूला ‘ऋतुराज” सुद्धा म्हटले जाते. 

वसंत पंचमीच्या शुभ मुहुर्तावर सुरु होणाऱ्या या ऋतुत निसर्ग मोहरीच्या पिवळ्या फुलांचे परिधान करून मनाला मोहीत करीत असतो. वसंत ऋतुत रक्‍ताभिसरणाची क्रिया जलदगतीने होत असल्यामुळे शरीरात स्फूर्ती राहते. 

वसंत ऋतुत उष्णतेमुळे होणारा भयंकर दाह व तापही नसतो आणि वर्षा ऋतुप्रमाणे नदी-नाल्यांना पुरही येत नाही आणि शिशिर ऋतुप्रमाणे थंडगार हवा, हिमवर्षाव व धुकेही नसते. याच कारणामुळे वसंत ऋतुला ‘ऋतुराज’ म्हटले गेले आहे. वातावरणात अनेक पुष्प, फुले ह्या काळात येतात नवं चैतन्य असते.

ज्याप्रमाणे बर्फाळ भागात सूर्य किरणे पडल्यावर जसा बर्फ वितळतो अगदी त्याचप्रमाणे थंडी नंतर आलेल्या गरमी मुळे ह्या काळात आपल्या शरीरातील कफ वितळतो आणि आपल्याला कफ विकार उद्भवतात. बऱ्याच वेळा दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना ह्या ऋतूत हि छातीत कफ अधिक भरल्याने दम्याचे वेग येतात.

वसन्ते निचित: श्लेष्मा दिनकृभ्दाभिरीरित: ।

 हेमंत ऋतुत संचित झालेला कफ वसं ऋतुत सूर्यकिरणांनी द्रवीभूत होऊन प्रकुपीत होतो. यामुळे वसंत ऋतुत खोकला, सर्दी-पडसे, टॉन्सिल्सना सूज येणे, घस खवखवणे, शरीरात सुस्ती येणे, शरीर जड वाटणे इ. तक्रारी निर्माण होण्याची शक्‍यता असते. या ऋतुत जठराग्नी मंद होतः असल्यामुळे आहार-विहाराबाबत सावध रहावे. शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला कफ वसंत ऋतूमधील प्रखर सूर्यकिरणांनी प्रकूपित झाल्याने अग्निला क्षीण करून अनेक येग उत्पन्न करतो; म्हणून वसंत ऋतूमध्ये खालील पध्दतीचा आहार विहार ठेवावा.

वसंत ऋतुचर्या आहार-विहार:

वसंत ऋतुचर्या :- पथ्य आहार

  • जूने जव, गहु यांचे पदार्थ
  • वसंत ऋतुत हळूहळू संरक्षकांचे प्रमाण कमी केल्यास उष्णता थांबविली पाहिजे आणि आहार सध्या पचण्यायोग्य आहारात घेतला पाहिजे.
  • बार्ली, हरभरा, ज्वारी, गहू, तांदूळ, मूग, अरहर, मसूर डाळ, मुळा, पडवळ, कडू, कोळंबी, वेलची, हिंग, दालचिनी, हळद, आवळा इत्यादी पदार्थ खाणे खूप फायदेशीर आहे.
  • भाजलेले मांस ( कोंबडा, बकरा इ.)
  • पचण्यास हलकी व रूक्ष अन्न खावीत ( सातू, साळीच्या लाह्या इ.)
  • सुंठयुक्त पाणी
  • मध व साधे पाणी
  • नागरमोथा सिध्द जल पिण्याकरिता वापरावे.
  • या ऋतुत कफाचा प्रकोप करणाऱ्या पौष्टिक आणि पचावयास जड पदार्थांची मात्रा हळूहळू कमी करून वातावरणातील उष्णता वाढताच हे पदार्थ वर्ज्य करून साधा, पचावयास हलका घेण्यास सुरुवात केली पाहिजे.
  • या ऋतुत जड, तेलकट, आंबट व गोड पदार्थांचे सेवन तसेच दिवसा झोपणे वर्ज्य आहे.
  • या ऋतुत तिखट, कडू व तुरट रसप्रधान द्रव्यांचे सेवन करणे हितकर आहे. प्रातःकाळी फिरत असताना कडूलिंबाची कोवळी १५-२० पाने चावून-चावून खावीत. त्वचा रोग, रक्त विकार, ताप इत्यादीपासून प्रतिकारशक्ती निर्माण करते.

वसंत ऋतुचर्या :- अपथ्य आहार

  • साखर, ऊस, बटाटा, म्हशीचे दूध, उडीद, पाकळी, खिचडी, आंबट, गोड, गुळगुळीत पदार्थांचे सेवन हानिकारक आहे. हे कफ वाढवते.
  •  या हंगामात पचन करताना जड पदार्थांचे सेवन करू नये. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, बर्फ, चॉकलेट, मैदा, खमीर, दही इत्यादी सेवन पूर्णपणे टाका.
  •  तळलेले, भाजलेले आणि मसालेदार लोणचे वगैरे टाळा कारण यामुळे पित्त वाढू शकतो. उडीद, राजमा, हरभरा इत्यादी पचायला कठीण असलेल्या गोष्टी खाऊ नका. गोड (साखर, मध इ.) किंवा वंगणयुक्त पदार्थ (तूप-तेल, पकोरे इ.) कमी खा.
  • उन्हात जास्त काळ राहू नका कारण ते पित्त वाढवू शकते. डाळी (मूग, मसूर इ.) हलके पर्याय खा. जास्त मीठ आणि मसाले असलेल्या गोष्टी टाळा.
  •  दिवसा झोपू नका.

वसंत ऋतुचर्या :- पथ्य विहार

  • पंचकर्म उपक्रम- वमन, नस्य
  • हिरडा चुर्ण नियमित सेवन करणाऱ्यांनी या ऋतुत हे चूर्ण थोड्याशा मधात मिसळून घ्यावे.
  • या ऋतुत उटणे लावणे, तेलाची मालीश, उन्हात बसणे, कोमट पाण्याने स्नान, योगासन व हलका व्यायाम केला पाहिजे. रात्री गरम झाल्याने व सकाळी उशीरा उठल्याने पोटातील मल सुकतो, डोळे व चेहऱ्याची कांती क्षीण होते. म्हणून या ऋतुत रात्री उशीरा झोपणे व सकाळी उशीरा उठणे स्वास्थ्यास हानिकारक आहे.
  • सकाळच्या (पहाटेच्या) थंड हवेमध्ये चालणे.
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंजन इ. चा वापर करावा.
  • कवल धारण (औषधी काढे / तेलाचे) करणे
  • कफाचा त्रास असल्यास धूमपान (औषधी द्रव्यांचे) करावे.
  • कर्पूर, चंदन, अगरू, केशर इ. चूर्णांनी बनविलेले सुगंधि उटणे लावुन मर्दन करावे.
  • व्यायाम 

वसंत ऋतुचर्या :- अपथ्य विहार

  • या हंगामात दिवसा झोपणे हे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे कारण या हंगामात दिवसा झोपेमुळे झोपेची समस्या उद्भवते.त्यामुळे वसंत ऋतूमध्ये दिवसा झोपू नये. इच्छित असल्यास आजारी किंवा वृद्ध एक तास झोपू शकतात.
  • पचण्यास जड, आंबट, गोड, स्निग्ध पदार्थांचा वापर करू नये. (उदा. पनीर, चीज, विविध मिष्ठान्न, दही इ.)
  • प्रखर सूर्यकिरणांचे सेवन करणे टाळावे

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत