शिरोधारा Shirodhara

आजच्या धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण, जागरण, स्पर्धा, या सर्व हेतूमुळे शरीरात वाताची वृद्धी होताना दिसते. अशावेळेस शिरोधारेचा वापर त्या विकृत वाताला जिंकण्यासाठी करतात. वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स व स्पामध्ये शिरोधारेचा वापर करून लोंकाना रिल्याक्सेशन् दिले जाते. शरीराला रिल्याक्सेशन मिळणे एवढाच तोकडा फायदा आयुर्वेदाला अपेक्षित नाही. शिरोधारेचे बरेच फायदे ग्रंथात सांगितलेले दिसतात. प्राणा: प्राणभूतां यत्राश्रिता […]

नेत्र तर्पण- Netra Tarpan

Netra Tarpan Ayurvedic eye treatment by Dr. Harshal Nemade

तर्पयतिति, तृप्तीकरं यद्‌ तद्‌ तर्पणम्‌ । ज्या क्रियेमुळे अवयवास तृप्ती मिळते त्या क्रियेस तर्पण असे म्हणतात. डोळ्यांना झालेले विविध आजारांच्या चिकित्सेमध्ये डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने नेत्रतर्पण हा एक चिकित्सा उपक्रम सांगितलेला आहे.नेत्रतर्पणाने मानेवरील अवयवांचे व नेत्रगत असलेल्या दोषांचे स्त्रावरूपाने शोधन व शमन केले जाते. नेत्र तर्पण विधी :- नेत्रतर्पण सकाळी किंवा सायंकाळी

पुटपाक

पुटपाक हा नेत्रतर्पणानंतर केला जाणारा एक चिकित्सा उपक्रम आहे. तर्पणानंतर डोळ्यास आलेली क्लिन्नता दूर करण्यासाठी, नेत्रबल वाढविण्यासाठी पुटपाक उपक्रम केला जातो. नेत्रतर्पणाने डोळ्यातील दोष, रोग शांत झाल्यानंतरच पुटपाक द्यावा. तर्पण करण्यायोग्य व्यक्तीमध्येच किंवा रुग्णांमध्ये पुटपाक केला जातो. पुटपाकासाठी वापरली जाणारी औषधे व डोळ्यांच्या विविध रोगांमध्ये केल्या जाणाऱ्या उपयोगानुसार पुटपाक तीन प्रकारे करता येतो. पुटपाकाचे प्रकार

नेत्रधावन

।। सर्वेन्द्रियाणां नयनं प्रघानम्‌ ।। सर्व इंद्रियांमध्ये नयन (नेत्र, डोळा) हे प्रधान इंद्रिय आहे. डोळा व दृष्टी ही परमेश्वराने मानवाला दिलेली पंचज्ञानेंद्रियांतील सर्वोत्कृष्ट देणगी आहे. मानवाचे बहुतांशी ज्ञान व जीवनपद्धती ही डोळा व दृष्टीवर अवलंबून असते. अशा प्रधान इंदियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व इंद्रियास झालेल्या आजारांच्या चिकित्सेसाठी आयुर्वेद शास्त्राने ‘नेत्रधावन’ हा एक चिकित्सा उपक्रम सांगितेलेला आहे. ॥

नस्य पंचकर्म 

डॉ. हर्षल नेमाडे यांच्याकडून नस्य पंचकर्म उपचार

आपले संपूर्ण शरीर व संपूर्ण विश्व हे पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळेच ‘जे पिंडीते ब्रह्मांडी’ या न्यायाने आपल्या आसपासच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीर व मनावर परिणाम होत असतो.बाह्य जगाचे हे ज्ञान आपल्या शरीराला पंचज्ञानेंद्रियामार्फत होत असते. (कर्ण-नेत्र-नाक-त्वचा-जिव्हा) म्हणूनच यापैकी एकाचेही कार्य उणावले तरी संपूर्ण शरीराचा समतोल ढासळू शकतो. नाक है त्यापैकीच एक

लेप-उपचार

वेदना, सुज व त्वचारोगांसाठी लेप पंचकर्म

आपण रोजच्या जीवनात अनेक असे आजार पाहत असतो की त्यावर आपल्या घरातील थोर व्यक्ती अमूक अमूक गोष्टीचा लेप करा असे सांगत असतात. लेप म्हणजे काय? एखाद्या औषधाचे चूर्ण पाण्यात दुधात, ताकात किंवा इतर द्रव पदार्थात एकत्र करून दुखणाऱ्या भागावर लावणे किंवा औषधी वनस्पती पाण्यात, दुधात, ताकात इत्यादींमध्ये उगाळून त्याचा गंध दुखणाऱ्या भागावर लावणे म्हणजे लेप

ताक

tak buttermilk hot or cold

तक्रं लघु कषायाम्लं दीपनं कफवातजित्‌ ॥ ३४ ॥शोफोदरार्शोग्रहणीदोषमूत्रग्रहारुचीः प्लीहगुल्मघृतव्यापग्द्रपाण्डवामयाज्जयेत्‌ ॥ ३५ ॥ ताक हलकें, आंबट व किंचित्‌ तुरट, वातनाशक, कफघ्न व दीपक असून सूज, उदर, मूळव्याध, संग्रहणी, मूत्ररोग, ग्रह ( बालग्रह इत्यादि ), अरुचि, पांथरी, गुल्म, पांडू व विष आणि घृतजन्य विकार यांचा नाश करिते.हा दुधापासून बनणारा पदार्थ आहे. दुधाचे दही व दही घुसळून ताक केले

आरोग्यास गुणकारी पानक- सरबत

Leave a Comment / Uncategorized / By Vaidya Harshal Nemade पानक – सरबत उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळ्याचे पाय थंड पेयांच्या दिशेला वळू लागतात. उन्हाळ्याच्या काळात वातावरणातील सूर्याची तेजस्वी किरण आणि अति-पातळ गरम हवा शरीरातील ओलसरपणा कमी करते. वाढलेली उष्णता, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे वाहत असलेली गरम वाऱ्याची झळ, खूपच कष्टदायक व स्वास्थ्यास हानिकारक ठरते. यामुळे शरीरातील जलीय अंशाचा नाश

रक्तमोक्षण

डॉ. हर्षल नेमाडे यांच्याकडून रक्तमोक्षण पंचकर्म उपचार

रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे त्याग करणे, सांडणे, वाहविणे, विकारकारक दृष्ट रक्ताचा त्याग केल्यावर आजाराचा जोर कमी पडून रुग्णास बरे वाटावे हा आयुर्वेद चिकित्सकांचा नेहमीचा अनुभव आहे. रक्तमोक्षण : ज्या चिकित्सा पध्दतीमध्ये रूग्ण शरिरातून दूषित झालेले रक्‍त बाहेर काढले जाते त्या क्रियेस रक्‍तमोक्षण असे म्हणतात. रक्त हे लाल असते हे खरे पण जे लाल असते ते रक्तच

विरेचन पंचकर्म

पित्त विकारांवर आयुर्वेदिक विरेचन पंचकर्म

पंचकर्म ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण शरीर शोधन चिकित्सा पद्धती असून हे आयुर्वेदाचे भूषणच म्हणावे लागेल. या पंचकर्म उपचारांनी शरीरातील बिघडलेल्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषांना (वात-पित्त-कफ) योग्य रितीने शरीराबाहेर काढून टाकले जाते, त्यामुळे दुर्धर रोग, वारंवार उद्‌भवणारे आजार, लहानसहान शारीरिक तक्रारी चांगल्याप्रकारे बऱ्या होतात. शिवाय निरोगी माणसाचे आरोग्य उत्तम टिकवले जाते. पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले