जिभ अडखळत असल्यास- हळद, वेखंड, कोष्ट, विपळी, सुंठ,अजमोदा, जेष्टमध, सैंधव यांचे चूर्ण करून तुपाबरोबर खावे. म्हणजे जिभेचे जडत्व जाते. जिव्हास्तंभ व वायू जाऊन वाचाशुद्धी चांगली येते.
जिभेस चरे पडतात त्यासाठी शुद्ध तुरटीची लाही तुपातून जिभेस चोळावी.
जिभेचा तोतरेपणा जाण्यास जिरे, काळे जिरे, गजगा, हळद, समभाग चूणे करून निम्मे भाजून व निम्मे कच्चे दोन्ही मिसळून जिभेस चोळावे व मधातून खाण्यासही द्यावे.
लाल गळते त्यासाठी मोहरी व खडीसाखर तोंडात धरावी.
बोलतांना जिभ अवघडत असल्यास अक्कलकार पाण्यात उगाळून चोळावा.