वेदनांचा विचार करतांना बर्याचदा घसादुखी, संग्रहणी, पोटाचा त्रास, आव, मुळव्याध, दंश, अतिचिंता, त्वचा रोग, स्थौल्य अनुवंशिकता, आघात, रक्ताल्पता, अर्बुद, ग्रंथी, गर्भाशयाचे आजार, रजोदृष्टी, बाळंतपण, मधुमेह, ब्लडप्रेशर, रक्तपित्त, मद्यपान, धुम्रपान, स्थूलपणा, कृ शपणा, अस्थिविकृती, जन्मजातविकृती अशा साधारण रोगांचा विचार आयुर्वेदात केला गेला आहे. त्यामुळे फक्त वेदनाशामक ओषधे घेऊन बरे होतो. असा विचार कोणीही करु नये अशा प्रकारची औषधे घेऊन तात्पुरता आराम मिळत असला तरी त्याने वृक्क, जठर, रक्तवाहिन्या, मस्तिष्क, यकृत, मेद, शुक्रधातू यावर घातक परिणाम होऊन त्याचे निराळे आजार वेदनेसह शरीरात घर करून राहतात.