अर्थात शरीराला धारण करणारे तीन दोष (वात, पित्त, कफ) सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) तीन मल (मूत्र, स्वेद, पुरीष) आणि अग्नि, पचनशक्ती हे १४ घटक यांची कार्य प्राकृत असणे, इंद्रिये (ज्ञानेंद्रिये, कर्मेद्रिये) आणि त्याचबरोबर मन, आत्मा प्रसन्न असणे हे “स्वस्थ” अर्थात निरोगी माणसाचे लक्षण आयुर्वेदाने सांगितले आहे. कारण सध्या प्रचंड धावपळ, ताणतणाव यामुळे शारिरीक आजारांसह मानसिक विकारांचे प्रमाण वाढत आहे. निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य पाहिजे असेल तर आजार का होतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.